पिरंगूट : बावधन बुद्रूक येथील सरकारी गायरानतील विकसित न झालेले क्षेञ गावच्या विकासासाठी व रहिवाशी यांच्या हितासाठी पुन्हा गावाला उपलब्ध करून द्यावे अशी मागणी बावधन बुद्रूक ग्रामस्थांनी केली असून या संदर्भात राज्याचे महसुल मंञी बाळासाहेब थोरात यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे.
याबाबत माहिती अशी की, बावधन बुद्रुक येथील सरकारी गायरान मिळकत सर्वे नं २३ मधील बहुतांश क्षेञ हे वेगवेगळ्या संस्था व विभागाना वाटप करण्यात आले आहे. परंतु अद्यापही संबंधित संस्थांनी हे वाटप करण्यात आलेले क्षेत्र विकसित केलेले नाही. त्यामुळे हे क्षेत्र पुन्हा एकदा गावाला मिळावे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
हे निवेदन आमदार संग्राम थोपटे याच्या मार्गदर्शनाखाली सुहास दगडे, माजी सरपंच निलेश दगडे, विद्यमान उपसरपंच दिपक दगडे, बापुसाहेब दगडे, सुर्यकांत भुंडे, आझाद दगडे, अभिजीत दगडे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान महसूल मंञी बाळासाहेब थोरात यांनी जिल्हाधिकारी डाँ.राजेश देशमुख यांच्याशी चर्चा करून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे निवेदन दिलेल्या बावधन ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.