पिरंगूट : भुकूम येथील सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी विकासाची गंगा प्रत्येक नागरिकाच्या घरा पर्यंत पोचवण्याचे काम केले पाहिजे तसेच माजी आदर्श सरपंच नामदेव आण्णा माझिरे यांचा आदर्श घेवुन आपल्या गावाचा विकास केला पाहिजे. असे मत महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशचे सदस्य श्रीरंग नाना चव्हाण पाटिल यांनी भुकूम येथे व्यक्त केले.
भुकूम गाव नवनिर्वाचित सरपंच रेखा योगेश वाघ,उपसरपंच सचिन आंग्रे आणि सर्व सदस्य तसेच मुळशी तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती नवनिर्वाचित संचालकांचा आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांच्या सत्कार प्रसंगी श्रीरंग नाना चव्हाण बोलत होते.यावेळी किर्तनकार हभप राजेंद्र महाराज दहिभाते,प्रा.राजु मते,भानुदास पानसरे,ॲड ज्ञानेश्वर पानसरे, गौरी माझिरे यांनी मनोगत व्यक्त केले .यावेळी ओम शांतीच्या वतीने सुद्धा रुपाली शिंदे, गितिका साहू यांनीही सर्वांना ओम शांतीची प्रतिमा देवून सन्मानीत केले.
यावेळी भुकूम, नांदगाव, मांरूजी, हिंजवडी, कासारसाई येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्य याचा सन्मान करण्यात आला.
यावेळी मुळशी तालुका कुषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दगडूकाका करंजावणे,संचालक शिवाजी आप्पा तांगडे,सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संतोष कुंभार,मुळशी तालुक्यातील पहिली महिला पत्रकार प्रतिक्षा ननावरे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुभाष नामदेवराव माझिरे यांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हभप दशरथ महाराज वहाळे, मदन माझिरे यांनी केले.तर प्रसाद भरतवंश यांनी आभार प्रदर्शन केले.