पौड : मुळशी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पंचनामे करुन त्यांना त्वरीत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख सचिन खैरे यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख तसेच निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांच्याकडे मागणी केली आहे.
मुळशी तालुक्यात झालेल्या अति मुसळधार पावसामुळे सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेल्या पेरणीच्या पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या शेतातील पीक या पावसामुळे पूर्णपणे नष्ट झालेली आहेत.त्यामुळे शेतकऱ्यावर कोसळलेल्या नैसर्गिक संकटामुळे मोठे आर्थिक नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.गेल्या आठवडा भरापासून पावसाची संतधार सुरूच आहे.सततच्या पावसामुळे सर्वच भागात अतिवृष्टी झाली.
त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे, घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ,बांध वाहून गेले आहेत जमिनीत पाणीच पाणी साचले आहे.पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.त्यामध्ये आपण लवकरात लवकर लक्ष घालून पहाणी करून तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी शिवसहकार सेनेचे तालुका तालुकाअध्यक्ष ज्ञानेश्वर डफळ,भारतीय विद्यार्थी सेना सरचिटणीस संतोष लोयरे,तालुका उसंघटक पांडुरंग साठे,सचिन खैरे,विजय शिंगटे,नितीन लोयरे यावेळी उपस्थित होते.