logo
add image
add image
Blog single photo

पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यानी केले ५०० पेक्षा जास्त प्रकल्प सादर


पिरंगूट : चैतन्य विद्या प्रतिष्ठान ,पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बावधन  सूस पिरंगुट व पौड अशा चारही शाखांमध्ये विज्ञान दिवस आणि मराठी राजभाषा दिन उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला. या दिनाचे औचित्य साधून शाळेत विज्ञान आणि मराठी प्रदर्शन भरविण्यात आले होते.

          या कार्यक्रमासाठी बावधन येथे इस्रोचे वरीष्ठ वैज्ञानिक डॉ. अरुण कुमार सिन्हा, मन करारे प्रसन्न या कार्यक्रमाचे वक्ते डॉ. संजय उपाध्याय सर,डॉ. दिलीप देशमुख तसेच शाळेचे संस्थापक राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल, शाळेच्या मुख्याध्यापिका नीलिमा व्यवहारे, विभाग प्रमुख रुचिरा खानवलकर, अश्विनी नाळे, रश्मी पाथरकर, सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते. 

           सूस शाखेत नांदेच्या सरपंच निकिता रानवडे , भाजपच्या महिला आघाडी अध्यक्षा कांचन कुंबरे, संस्थेच्या संचालिका शिवानी बांदल, यश बांदल,शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मल पंडित, पर्यवेक्षक शुभा कुलकर्णी आदी मान्यवरांनी दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ केला.

प्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक व संत यांचा मेळ साधून एक आगळा वेगळा रम्पवॉक विद्यार्थ्यानी सादर केला तर मराठी दिनाचे औचित्य साधून गुढीपाडवा ते होळी सर्व सण स्कीट मधून दाखवले व आपल्या भारतीय रूढी परंपरा व त्यामागील वैज्ञानिक कारण याचा अतिशय सुंदर मेळ साधून आपल्या रूढी परंपरा कशा वैज्ञानिक द्रुष्टीने बरोबर आहेत याचे अतिशय कल्पकतेने विद्यार्थ्यानी सादरीकरण केले. सर्व मान्यवर ,शिक्षकव्रुंद व विद्यार्थ्यांस यातून आपली सांस्क्रुती व विज्ञान उलगडून दाखवले.

        पिरंगुट शाखेत क्रीडा पत्रकार संजय दुधाणे,पत्रकार धोंडीबा कुंभार , योगेश सोनवणे,दीपक कंधारे व पौड शाखेत सरपंच जगदीश लांडगे, श्याम नवले, प्रदीप साठे आदी मान्यवरांसमवेत शाखेचे मुख्याध्यापक अभिजित टकले, पर्यवेक्षिका पूनम पांढरे, सना इनामदार, पल्लवी नारखेडे ,जिनी नायर आदींच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा श्री गणेशा करण्यात आला.

            प्रत्येक गोष्टीमागे, घटनेमागे काहीतरी वैज्ञानिक कारण असते हे शोधण्यासाठी विध्यार्थ्यांना प्रवृत्त करणाऱ्या, मार्गदर्शन देणाऱ्या पेरिविंकल शाळेत सुमारे ५०० पेक्षा अधिक विज्ञानाचे प्रकल्प सादर करण्यात आले. त्यात सोलार, चुंबकीय रेल्वे, हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर प्लांट, इंडो, मॅजिक पेंट, बटाट्यापासून सेन्सर लाईट, प्रदूषणाची कारणे, पचनसंस्था, केमिकल्स रीएक्शन, अंधाऱ्या खोलीतील अवकाश दर्शन, प्रवेश द्वाराजवळ आकर्षक असे अग्नीक्षेपणास्त्र ठेवण्यात आले. अश्याप्रकारे अतिशय नीटनेटके संपूर्ण माहितीसह विद्यार्थ्यांनी हे प्रकल्प सादर केले. विज्ञान प्रदर्शनासोबतच मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून मराठी भाषा प्रदर्शन देखील भरविण्यात आले.

     मराठी प्रदर्शन तीन दालनामध्ये  भरविण्यात आले, पहिले दालन मराठी परंपरा - यामध्ये मराठी संत, मराठी लेखक, लेखिका, कवी, कवयित्री यांची माहिती त्याचप्रमाणे ग्रंथदिंडी तयार करण्यात आली.दुसऱ्या दालनामध्ये मराठी संस्कृती म्हणजेच मराठी सण, समारंभ, मराठी मातीतील खेळ यांचे प्रकल्प माहितीसह मांडण्यात आले तर तिसऱ्या दालनात अभ्यासविषयक खेळ व गमतीजमती मांडण्यात आल्या. 

         दोन्ही प्रदर्शनासाठी इयत्ता पाचवी ते दहावी विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे भाग घेतला. त्यासाठी केलेली तयारी वाखाणण्याजोगी जोगी होती.सर्व विद्यार्थ्यांना व्यवस्थापकीय समिती आणि शिक्षकवृंदांचे मार्गदर्शन मिळाले होते.

         या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथींच्या हस्ते सी. व्ही. रमण यांच्याफोटोचे रासायनिक शिंपण करून अदृश्य ते दृश्य स्वरूपात उठावदार करून उद्घाटन केले त्याचप्रमाणे होमकुंडात रसायनाच्या साहाय्यने अग्नी प्रज्वलित केला. कुसुमाग्रज आणि सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन, सरस्वती पूजन,आणि दिपप्रज्वलाने झाली.   घटकांच्या जागी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना उभे करून आवर्तसारणीची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी विज्ञान आणि मराठी दिनाची माहिती सांगितली. 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' या गीताने मराठी भाषेचा अभिमान व्यक्त झाला.

        शाळेचे संस्थापक राजेंद्र बांदल सरांनी आपल्या भाषणात मराठी आणि विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रमुख अतिथींनी आपले विचार व्यक्त करताना मिसाईल मॅन ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव विद्यार्थ्यांना सांगितला. 

         संजय उपाध्याय यांनी आपल्या भाषणातून मराठी आणि विज्ञान विषयाचे महत्त्व पटवून देत विचार व्यक्त केले.

शाळेच्या मुख्याध्यापिका नीलिमा व्यवहारे यांनी विज्ञान दिनासोबत कुसुमाग्रज यांच्या कणा या कवितेचा अर्थ स्पष्ट केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी केले.

 अश्याप्रकारे  आनंदात,  उत्साहात आणि नवीन ज्ञानात भर पडणारे हे प्रदर्शन पार पडले. सर्व शाखांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल,संचालिका रेखा बांदल,इस्रोचे शास्त्रज्ञ सिन्हा  ,गणिततज्ञ दिलीप देशमुख यांनी आवर्जून भेट देऊन सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला.

add image
add image

Leave Comments

Top