logo
add image
add image
Blog single photo

कासारआंबोलीच्या सरपंचपदी रंजित गायकवाड यांची बिनविरोध निवड


पिरंगूट : कासारआंबोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रंजित गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून रंजित गायकवाड यांच्या रुपाने ५० वर्षांनंतर गायकवाड भावकीला सरपंचपदाची संधी मिळाली आहे.

       सरपंच सचिन धुमाळ यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी रणजित गायकवाड यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने रणजित गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी उपसरपंच सुवर्णा मारणे, ग्रामपंचायत सदस्य सचिन धुमाळ, ऊमेश सुतार, स्वप्निल शिंदे, शंकर सुतार, स्वप्निल कांबले,छाया भिलारे,माधुरी धुमाळ प्रिती शिंदे, नेहा सुतार, रेश्मा गायकवाड , पुजा सुतार हे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

       हि निवडणूक माजी सरपंच राजेंद्र मारणे ,प्रदिप सुतार,राजाभाऊ शिंदे,मोहन शिंदे,उमेश सुतार,अतुल सुतार,तुषार मानकर,विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवडणुक पार पडली. तर नवनियुक्त सरपंच रणजित गायकवाड यांना राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे,माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सविता दगडे,शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे,जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर,शिवसेना तालुका प्रमुख सचिन खैरे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दगडुकाका करंजावणे,युवा नेते अनुप मारणे,शिवसेना महिला आघाडी सहसंपर्क संघटीका स्वाती ढमाले यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.मंडल अधिकारी मनोहर लोले, सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक देवकर, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव,पोलिस नाईक राँकी देवकाते,पोलिस पाटील स्वाती सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक शांततेत पार पडली.

add image
add image

Leave Comments

Top