बावधन : डिप्लोमा ,डिग्री आणि इंजिनियरिंग पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी जे .एस. पी .म चे संस्थापक सचिव व टी. एस. एस. एम. चे अध्यक्ष आणि आमदार प्रा. डॉ. टी.जे .सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज मध्ये 'जलाशयाच्या निर्मितीमुळे निर्माण होणारे भुकंप प्रवण क्षेत्राचा अभ्यास' या विषयावरती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या व्याख्यानात महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून साधारण 450 हून अधिक विद्यार्थी, प्राध्यापक आणि भूविज्ञान क्षेत्रातील तज्ञ लोकं सहभागी झाले होते.या सोहळ्याचे प्रमुख वक्ते आदरणीय कुलगुरू डॉ नितीन करमळकर होते.
कार्यक्रमाला टी. एस. एस. एम. चे सचिव गिरीराज सावंत साहेब, पि वि पि आय टी चे प्राचार्य डॉ सि एम सेदानी, संकुल संचालक डॉ वि ए बुगडे, स्थापत्य विभाग प्रमुख डॉ आर आर सोरटे आणि Indian Geotechnical Society तर्फे विकास पाटील, चेअरमन IGS Pune, रमेश कुलकर्णी माजी चेअरमन IGS पुणे, सुमन जैन, सचिव IGS पुणे, अन्नपूर्णी अय्यर, सह सचिव IGS Pune उपस्थित होते.
प्राध्यापक डॉ नितीन करमळकर सरांनी बहुउद्देशीय विषय सादरीकरण मधून भूविज्ञान विषयाबद्दल मार्गदर्शन केले. जलाशयाच्या निर्मितीमुळे निर्माण होणारे भुकंप प्रवण क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक ड्रिलिंग हे एक अधुनिक व विश्वसनिय शास्त्र आहे. सदरील व्यख्यानात करमळकरांनी बॅसॅल्ट मधील असणारे भेगा, चीरा व त्यांचा भुकंपाशी असणारा संबंधांविषयी माहिती दिली. त्यातून धरण क्षेत्रात पाण्याचा साठा व त्याचा होणाऱ्या भुकंपावरील परिणाम त्यांनी कोयना धरणाचा उदाहरण देऊन व्यवस्थित माहिती विद्यार्थी मित्रांना दिली.
डॉ सि एम सेदानी विषयाला अनुसरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गिरीराज सावंत साहेबांनी डॉ करमळकर यांना मार्गदर्शन आणि विषय सादरीकरणासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच विकास पाटील सर आणि अन्नपूर्णी अय्यर मॅडम यांनी सुद्धा कार्यक्रम आणि सादरीकरण साठी शुभेच्छा दिल्या.
प्राध्यापक अवधूत कडू, प्राध्यापक मयुरी इंगळे, प्राध्यापक श्रध्दा बेंडसुरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली. डॉ रविराज सोरटे यांनी स्वागतपर भाषण केले. डॉ डी बी जासूतकर यांनी आभार प्रदर्शन केले.