पौड : पीएमआरडीएच्या (पुणे महानगर नियोजन समिती) ७ जांगासाठी होत असलेल्या निवडणूकीसाठी होत असलेल्या मतदानात मोठी चुरस निर्माण झालेली होती तथापि या निवडणूकीत १००% मतदान झाले असून तालुक्यातील ९० पैकी ९० सरपंच मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.
मुळशी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागलेली असून काँग्रेसनेही मोठे आव्हान उभे केले असल्याचे चिञ मतदानावेळी पाहायला मिळाले. शिवसेना व भारतीय जनता पार्टीचे उमेदवारही निवडणूकीत यश मिळावे म्हणून प्रयत्न करताना दिसत होते.माञ मतदान सुरू असताना महाविकास आघाडीचे तालुक्यातील नेते एकञ येऊन बसले असल्याचे चिञ पाहायला मिळाले.
बुधवार ( दि.१०) रोजी होत असलेल्या मतदानात मुळशी तालुक्यातील ९० पैकी ३४ सरपंच मतदारांनी अकरा वाजेपर्यंत आपल्या मतदानाचा हक्क बजाविला होता.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुळशीचे तहसिलदार अभय चव्हाण हे जबाबदारी पाहत आहे. या निवडणूकीसाठी एकूण २१ उमेदवार असून मुळशी तालुक्यातून सुखदेव तापकीर ( मुलखेड), निकीता सणस (भुगांव), मिंनाथ कानगुडे ( वेगरे ), आणि सुरेखा तोंडे (खेचरे ) हे चार उमेदवार आपले नशिब आजमावित आहेत.मतदान ठिकाणी पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, गटविकास अधिकारी संदीप जठार, पोलिस उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड हेसुध्दा उपस्थित होते.
यावेळी सभापती पांडुरंग ओझरकर,शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे, शिवसेना तालुका प्रमुख सचिन खैरे, काँग्रेस तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरे,भाजपा तालुका अध्यक्ष विनायक ठोंबरे, जेष्ठ नेते राजाभाऊ हगवणे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता दगडे, उपसभापती विजय केदारी, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब सणस, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित कंधारे, माजी गटनेते शांताराम इंगवले, माजी सभापती रविंद्र कंधारे,कोमल वाशिवले,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सचिन अमराळे,दूध उत्पादक संघाच्या उपाध्यक्षा वैशाली गोपालघरे, म्हाडाच्या संचालिका स्वाती ढमाले, युवासेना जिल्हाधिकारी अविनाश बलकवडे,राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष अंकुश मोरे,दिपाली कोकरे, संतोष मोहोळ,आबासाहेब शेळके,कैलास मारणे, माऊली कांबळे,निलेश पाडाळे,योगेश ठोंबरे, अंकुश उभे, मधूर दाभाडे,सुहास भोते,अमोल शिंदे, दगडूकाका करंजावणे,भगवान नाकती, भाऊ केदारी, निखिल अमराळे, विलास अमराळे, रमेश सणस,सुहास दगडे, कालिदास गोपालघरे, जितेंद्र इंगवले, लहूशेठ चव्हाण,अमित कुडले, अविनाश कानगुडे, हनुमंत सुर्वे,सागर धुमाळ, गणेश वाशिवले, प्रविण धनवे,महादेव गोळे,दत्ता झोरे,अक्षय सातपुते, बाळासाहेब सातपुते, बाळासाहेब तापकीर,समीर शेलार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना आणि काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.