पिरंगूट : ईडी -सीबीआय इतक्या वर्षात कोणालाही माहिती नव्हती. केंद्र सरकाराने त्याचा गैरवापर सुरू केला आहे.सत्ता असताना काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेसने धाडी टाकल्या नाहीत.केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करत आहे.या केंद्र सरकारने छञपतीचे नांव निवडणूकीत घेतले आणि ईडी - सीबीआय वाले महिलांना चौकशीसाठी बोलवतात.अशी टिका खासदार सुप्रिया सुळे यांनी भुगांव ( ता.मुळशी ) येथे केली
आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती व सहकारी संस्था निवडणूकीबाबत कार्यकर्ता मेळावा भुगांव येथील राजलक्ष्मी लाँन्स येथे पार पडला.यावेळी खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र उपाध्यक्ष महेश शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे, राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे जिल्हा अध्यक्ष सचिन घोटकुले, जेष्ठ नेते रामभाऊ ठोंबरे,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष भारती शेवाळे,मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे,सभापती पांडुरंग ओझरकर,जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित कंधारे,राष्ट्रवादी काँग्रेस भोर विधानसभा अध्यक्ष सुनिल चांदेरे,उपसभापती विजय केदारी,जिल्हा परिषद सदस्या अंजली कांबळे, मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष अंकुश मोरे,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता दगडे,माजी सभापती रविद्र कंधारे, माजी गटनेते शांताराम इंगवले, माजी सभापती कोमल वाशिवले, राधिका कोंढरे,जिल्हा दूध संघाच्या उपाध्यक्षा वैशाली गोपालघरे, महिला अध्यक्ष दिपाली कोकरे,मुळशी तालुका युवक अध्यक्ष निलेश पाडाळे,नामदेव आण्णा माझिरे, भाऊ केदारी,निखिल मारणे,भगवान नाकती, सुनिल वाडकर, दगडूकाका करंजावणे, उज्वला मारणे, चंदाताई केदारी, रूपाली ढोकळे,युवक कार्याध्यक्ष विलास अमराळे,माऊली कांबळे,संतोष पवळे,नेहा साठे,प्रविण धनवे,योगेश ठोंबरे,सतिश सुतार, सागर धुमाळ, बाळेसाहेब झोरे, सुनिता भोईर,कालिदास गोपालघरे, पोपट दुडे, लहू चव्हाण,संपत दळवी, विजय येनपुरे,नवनाथ चरवड उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, गेले दिड वर्ष अडचणीत गेले. कोविड मध्ये प्रशासनाने युध्द पातळीवर काम केले.लसीकरणात पुणे जिल्हा राज्यात अव्वल आहे.मुळशीला जी पाण्याची मागणी आहे त्याचा पाठपुरवा चालू आहे.महाविकास आघाडीचे सरकार सगळ्या समाजाला पुढे घेऊन जाणार असून. आरक्षणाचे नियोजन होऊनच निवडणूका होतील. संघटनेची ताकद कशी वाढेल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.देशात चांगले काम पुणे जिल्हा परिषदेचे आहे. आगामी निवडणूकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.
जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यावेळी म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मुळशी तालुक्यात मोठा विकास निधी आला आहे.कार्यकर्त्यांची फळी पक्षांच भांडवल आहे. तिकीट वाटपातून कोणीही नाराज होणार नाही यासाठी प्रयत्न करणार असून उमेदवारी मिळेल त्याचे काम सर्वांनी करावे.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे म्हणाले की, पौड- भुगावमध्ये बाह्यवळण मार्ग होणार आहे तर घोटावडे फाटा येथे उड्डाणपूलाची मागणी आहे. पीएमआरडीएने टाकलेल्या नवीन झोनसाठी अनेक हरकती आलेल्या आहेत. प्रत्येक नागरिकांचे निराकारण होणार आहे. पाणीपुरवठा योजनामध्ये ५५ लिटर प्रति माणसी पाणी मिळणार आहे.१५ वित्त आयोगाचा १००% निधी ग्रामपंचायतीला मिळत आहे. घनकचरा व सांडपाणीसाठी निधी मिळणार आहे.
मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष महादेव कोंढरे म्हणाले की,जिल्हा परिषदेवर वीस वर्ष तीन पैकी दोन जागा निवडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडून आल्या तर दहा वर्ष पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता होती. २०१२ ला पाच सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले.मुळशी तालुका शरद पवार यांना मानणारा तालुका आहे.उपमुख्यमंञी अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळेमुळे मोठा विकास निधी मुळशीला मिळत आहे. पूर्व भागातील वाढत्या नागरिकराणामुळे मुळशी टप्पा दोनची योजना राबविण्यात येणार आहे. तशा सूचना अजितदादा यांनी दिलेल्या आहेत. २०२२ साठी कोणाची उमेदवारी अंतिम नाही.घड्याळ हाच उमेदवार मानून कामाला लागावे.
माजी सभापती रविंद्र कंधारे म्हणाले की, २०१७ ला चांगले काम होऊनही काही जागा गेल्या. कोळवण गण, बावधन गण व पौड कासारआंबोली जिल्हा परिषद गटात पराभव झाला.पंचायत समितीला काही जण इच्छूक होते त्यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात काम केले त्यांना पक्षाने मोठी पदे दिली. का विरोधात काम केले. त्यांच्यावर कारवाई झाली नाही. उमेदवार का पडले याचा आढावा पक्षाने घेतला पाहिजे होता.पीएमआरडीएचे चुकीचे आराखडे झालेले आहे.
या कार्यक्रमाचे सूञसंचलन प्रा.संतोष गावडे यांनी केले.