पिरंगूट : चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लीश मिडियम स्कूलच्या बावधन, पिरंगुट , पौड व सूस या चारही शाखांमध्ये ७५ व्या स्वतंत्रदिनाचे अमृत महोत्सवी वर्ष ध्वजारोहण करून उत्साहात साजरा करण्यात आला.
या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल , संचालिका रेखा बांदल, हनुमान आखाडा प्रमुख गणेश दांगट, पत्रकार पप्पूशेठ कंधारे, खडकी रेजिमेंटचे जवान भालचंद्र कुंभार ,हरीश मातेरे,मुख्याध्यापिका नीलिमा व्यवहारे , रुचीरा खानविलकर ,रश्मी पाथरकर व सर्व शिक्षकवृद यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.मान्यवरांनी आपले देशाप्रति असलेले प्रेम, आदर व विचार भाषणात स्पष्ट केले.
सूस शाखेत संस्थेच्या संचालिका रेखा बांदल , प्रमुख पाहुणे ले. जनरल पारनाईक सर, मुंबई महापौर केसरीचे देवेंद्र पवार, चेतन आदवडे, निखिल पाटील, पवन पवार , मुख्याध्यापिका निर्मल पंडीत, पर्यवेक्षिका शुभा कुलकर्णी , सोनाली देऊसकर व शिक्षकवृद यांच्या उपस्थितीत ध्वज पूजन, ध्वजारोहण करून राष्ट्रगीत व झेंडा गीताने ध्वजाला सलामी दिली.प्रमुख पाहुणे ले जनरल पारनाईक यांनी झेंडा व त्याचे महत्व स्पष्ट करून आजची पिढी कशी सक्षम बनवता येईल याबद्दल मार्गदर्शन केले. संस्थेच्या संचालिका रेखा बांदल यांनी देशासाठी प्राण अर्पण केकेल्या अमर हुतात्मा व देशासाठी काय केले पाहिजे याबद्दल विचार स्पष्ट केले तर मुख्याध्यापिका निर्मल पंडित यांनी स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक म्हणून प्रत्येकाची काय जबाबदारी आहे ते ओळखून ती चोख बजावली पाहिजे असे विचार स्पष्ट केले.
पिरंगुट शाखेत संस्थेचे संचालक संदीप ढमढेरे ,उद्योजक पद्मनाभ वराडे , विठ्ठल शितोळे ,मुख्याध्यापक अभिजित टकले आदी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पर्यवेक्षिका पूनम पांढरे, सना इनामदार, पल्लवी नारखेडे , जिनी नायर व सर्व शिक्षक यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात भाषा, अभिव्यक्ती तसेच अभ्यासाचे महत्व, स्वातंत्र्य सेनानी व त्यांचे कार्य याबद्दल याबाबत महत्वपूर्ण माहिती दिली.
या सर्व कार्यक्रमाचे सर्व शाखांमधून १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना थेट प्रक्षेपण झूम लिंक द्वारे सादर करण्यात आले होते. कोविड निर्बंधा मुळे प्रत्यक्षात जरी विद्यार्थ्याना हा ध्वजारोहण सोहळा अनुभवायला नसेल मिळाला तरी ऑनलाइन सर्व विद्यार्थी उपस्थित राहून देशप्रती प्रेम व आदर दर्शवला.
स्वातंत्र्यदिनाचे अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून बावधन शाखेमध्ये विद्यार्थ्यासाठी विविध उपक्रम व ऑनलाइन उपक्रम घेण्यात आले तर सूस शाखेमध्ये १ ली ते १० वी सर्व विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्रता दिवसावर आधारित प्रश्न मंजूषा घेऊन प्री प्रायमरी ते ८ वी च्या विद्यार्थ्यासाठी विविध क्राफ्ट ,कलरिंग अशा प्रकारे विविध उपक्रम ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात आल्या. अशा प्रकारे अमृत महोत्सवी स्वतंत्रता दिवस अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
सर्व शाखांमध्ये या कार्यक्रमाचे नियोजन हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल व संचालिका रेखा बांदल यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याध्यापिका नीलिमा व्यवहारे, निर्मल पंडीत अभिजित टकले , रुचीरा खानविलकर यांच्या मर्गदर्शनखाली पर्यवेक्षक शुभा कुलकर्णी , सोनाली देऊसकर, पूनम पांढरे, सना इनामदार,पल्लवी नारखेडे, जिनी नायर यांच्या सहयोगाने सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मदतीने करण्यात आले होते. हा अमृत महोत्सवी स्वतंत्रता दिवस अत्यंत उत्साहात व आनंदात कोविड चे सर्व नियम पाळून अत्यंत शिस्तबद्ध पध्तीने साजरा करण्यात आला.