पौड : जिल्ह्यातील पहिल्यावहिल्या पुणे जिल्हा परिषदेच्या नांदे ( ता. मुळशी) येथील शाळेने या वर्षी देखील निकालात १०० टक्यांची बाजी मारली आहे. इयत्ता नववी व दहावीसाठी पुणे जिल्हा परिषदेने सुरू केलेली एकमेव शाळा असून पहिल्या वर्षाप्रमाणे या वर्षीही घवघवीत यश मिळविले आहे. जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी स्मिता गौड यांनी या यशाबद्दल शाळेचे कौतुक केले आहे.
या शाळेमधून कु. नूतन संतोष शिळीमकर हिने ५०० पैकी ४३० गुण (८६ टक्के) मिळवत प्रथम आली आहे. तर द्वितीय क्रमांक सूरज संतोष तापकीर याने ८४.८० टक्के गुण मिळव पटकावला आहे. तर स्ऐश्वर्या संजय खांदवे हिने ८२ . ४० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच सर्वच विद्याथ्र्यांनी ५० टक्यापेक्षा जास्त गुण मिळवीत यशस्वी झाले आहे. सर्व मुलांनी भरघोस गुण मिळवत यश संपादन केले आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व ग्रामस्थं व सरपंच प्रशांत रानवडे यांनी अभिनंदन केले आहे.
या शाळेला जिल्हा परिषदेने स्वयं आर्थिक सहाय्याने चालवली जाणारी शाळा म्हणून सन २०१८-१९ ह्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता नववी व दहावीचे वर्ग चालविण्यास परवानगी दिली. जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष विश्वास देवकोते, उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती विवेक वळसे पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी ही मंजूरी देऊन शाळा व्यवस्थापन समिती नांदे व राजमाता संस्कार प्रतिष्ठान, नांदे यांच्यावर शाळा चालवण्याची जबाबदारी सोपवली. आज त्यांनी घेतलेला निर्णय अतिशय सार्थ ठरवत शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे.
जिल्हा परिषदेद्वारा शाळा सुरू करण्याचा एकच उद्देश होता. तो म्हणजे गावातील शाळा इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच होती. पुढील वर्ग नसल्याने व दुसरीकडे जाण्या-येण्याची व्यवस्थानसल्याने गावातील व परिसरातील मुलीचे पुढील शिक्षण जवळपास बंदच होत होते. पालकांची आर्थिक परिस्थिती बेताचीच तसेच त्याचबरोबर आपल्या मुलींच्या सुरक्षिततेबाबत पालकांच्या मनात भिती होती. त्यामुळे अनेक मुलींना शिकण्याची इच्छा असूनही पुढे शिकता येत नव्हते.
या गोष्टिंचाच विचार करून मा. सरपंच प्रशांत रानवडे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन डांगे, विजय डांगे यांच्या नेतृत्वाखाली पालक व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य यांची मिळून बैठक झाली. पालकांच्या विनंतीचा व मुलींच्या शिक्षणाचा विचार करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदे येथे इयत्ता आठवी, नववी व दहावीचे वर्ग जोडण्याची तयारी केली आणि आज इयत्ता दहावीचे दूसरे वर्ष होतं. त्या पहिल्या वर्षाप्रमाणे दुसऱ्या वर्षाचा निकाल ही शंभर टक्के लागला आहे.
या संपूर्ण यशामध्ये गावचे माजी सरपंच प्रशांत रानवडे, सरपंच सौ. आरती रानवडे, उपसरपंच गुलाब ढमाले,सदस्य निकिता रानवडे, हेमलता रानवडे, सुनील जाधव, संघमित्रा ओव्हाळ,प्रिती करंजाव, व माजी सरपंच मारुती रानवडे, अविनाश करंजावणे, सागर करंजावने व सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील दत्तात्रय रानवडे, मा. सरपंच विठ्ठल रानवडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन डांगे, विजय डांगे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष संतोष रानवडे, अविनाश करंजावणे, सुनिल जाधव, मारुती मारणे, भानुदास करंजावणे,
संतोष ढमाले, सुदाम रानवडे, रोहिदास रानवडे, गुलाव ढमाले, आनंद रानवडे व सर्व सदस्य यांचे खूप मोठे योगदान आहे. इयत्ता आठवी, नववी, दहावीचे वर्ग सुरू करण्यामध्ये राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक शिवाजी सोनवणे यांचा ही खुप मोलाचा सहभाग आहे. त्याचबरोबर इयत्ता नववी आणि दहावीच्या मुलांची तयारी करून घेण्यासाठी विशेष अशी धडपड करणाऱ्या शुभांगी पिंगळे मोलाचे योगदान आहे. त्याचबरोबर शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली भंडारी यांचेही मोठे सहकार्य मिळाले आहे.
या शाळेत सध्या ३ शिक्षक असून नववीत २७ तर दहावीत २० विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत. ग्रामस्थांनी लुपिन रिसर्च सेंटर, नांदे यांना यासंदर्भात प्रस्ताव दिलेला तो प्रस्ताव ल्युपिन फाऊंडेशनने तत्काळ स्विकारत २ शिक्षकांचे मानधन देण्याची जबाबदारी स्विकारली आहे. उर्वरीत एका शिक्षकाचे मानधन मात्र ग्रामस्थं देत आहेत. हे असे एक आदर्श उदाहरण आहे.
प्रशांत रानवडे ( मा. सरपंच, नांदेगाव)