पौड : महाविकास आघाडी सरकारकडून राज्यातील शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांची वीज बीलाच्या नावाखाली लूट होत आहे. राज्यात बिल्डरांना विविध कर माफ करता मग शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांची वाढीव वीजबीले माफ का करत नाहीत , असा सवाल मुळशी भारतीय जनता पार्टीच्या प्रभारी भारती विनोद आणि मुळशी तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष विनायक ठोंबरे यांनी भरे ( ता.मुळशी ) येथे केला.
मुळशी तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आलेल्या वाढीव वीज बील माफीसाठी भरे येथील महावितरणच्या कार्यालयावर हल्लाबोल तसेच टाळाठोक आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपाच्या मुळशी प्रभारी भारती विनोद, तालुका अध्यक्ष विनायक ठोंबरे, वसंत चोरघे, मंदार घुले, मयुर कांबळे, बाळासाहेब कुरपे पाटील, काळूराम गायकवाड , आप्पा चव्हाण, संतोष मांदळे, मारूती कुरपे, पांडुरंग जाधव, सुरेश ठोंबरे, सुनिल शिंदे, सुनिल पाडाळे, अमोल धनवे, जीवन साखरे, जनाबाई गोळे, निता भेगडे, अलका ववले, हिमानी चौंधे, निता गुरव उपस्थित होते.