पौड : मुळशी तालुक्यात असलेल्या सर्व औद्योगिक कंपन्याचे स्ट्रक्चर तसेच फायर आँडिट करण्यात यावे अशी मागणी मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुळशीचे तहसिलदार अभय चव्हाण यांच्याकडे करण्यात आली आहे.
मुळशी तालुक्यात उरवडे रोडवर असलेली एसव्हीएस ॲक्वा टँक्नाँलाँजी या कंपनीला नुकतीच आग लागली. यामध्ये १५ महिला व २ पुरूषांचा जळुन मृत्यू झाला. या कंपनीने सर्व नियम पायतळी तुडवित कोणाचीही पर्वा न करता कंपनी चालू ठेवली होती. आग लागल्यानंतर येथील कामगार बाहेर पडण्यासाठी कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता. यामुळे अनेक निष्पाप नागरिकांचे जीव गेले तर काही जण जखमी झाले. अशी घटना पुढील काळात घडू नये म्हणून तालुक्यात असलेल्या सर्व कंपन्यांचे स्ट्रक्चर तसेच फायर आँडिट करण्यात यावे अशी मागणी मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे, सभापती पांडुरंग ओझरकर,उपसभापती विजय केदारी, जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित कंधारे, कार्याध्यक्ष अंकुश मोरे, भोर विधानसभा अध्यक्ष अध्यक्ष सुनिल चांदेरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दगडूकाका करंजावणे,महिला जिल्हा उपाध्यक्षा चंदा केदारी, भोर विधानसभा महिला अध्यक्षा उज्वला मारणे, महिला तालुका अध्यक्ष दिपाली कोकरे, युवक अध्यक्ष निलेश पाडाळे, कार्याध्यक्ष विलास अमराळे, ओबीसी सेल अध्यक्ष बाळासाहेब झोरे, जेष्ठ नागरिक सेल अध्यक्ष नामदेव आण्णा माझिरे, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष भाऊ केदारी, मिडिया सेल अध्यक्ष सतीश सुतार, माजी सरपंच कालिदास गोपालघरे, गण अध्यक्ष विजय येनपुरे, माजी विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष जितेंद्र इंगवले,भोर विधानसभा विद्यार्थी अध्यक्ष सागर धुमाळ, प्रविण धनवे, विजय मारणे तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.