logo
add image
add image
Blog single photo

चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी : शिवसेनेची मागणी


पौड : महाराष्ट्र राज्यासह मुळशी तालुक्यातील झालेल्या तौक्ते वादळामुळे मुळशी तालुक्यातील अनेक गावामध्ये घरांचे तसेच इतर मालमत्तेचे जे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख सचिन खैरे यांनी मुळशीचे तहसिलदार अभय चव्हाण यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

      मुळशी धरणभागात रविवारी अवकाळी पाऊस व वारा यामुळे विजेचे खांब कोलमडले.तलाठी व इतर तत्सम कर्मचारी यांनी पाहणी करून झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावे.ज्यांचे खरोखर नुकसान झाले आहे त्या शेतकरी बांधवांना शासन स्थरावर योग्य मदत मिळावी.यासाठी तालुका शिवसेनेच्या वतीने निवेदन मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांना देण्यात आले. शिवसहकार सेनेचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर डफळ,भारतीय विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस मुकेश लोयरे, शिवसेना उपविभागप्रमुख सुहास बामगुडे,उपसरपंच योगेश बामगुडे,नितीन लोयरे तसेच शिवसैनिक उपस्थित होते.

add image
add image

Leave Comments

Top