मुळशी : नुकत्याच झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा फटका मुळशी तालुक्याच्या पश्चिम भागाला बसला. यात अनेक जणांचे नुकसान झालेले असून त्याचे पंचनामे व्हावेत अशी मागणी काँग्रेस तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरे यांनी मुळशीचे तहसिलदार अभय चव्हाण यांच्याकडे केली आहे.
मुळशी धरणभागातील गोणवडी,पळसे,चाचिवली, निवे,सारोळे,ताम्हिणी, वाघवाडी, मोहरी,दावडी, बार्पे ,तिस्करी, भांबर्डे, आंबवणे,पेठशहापूर, पोमगांव, चांदीवली, नांदिवली, कुंभेरी, पिंपरी, वडूस्ते, आदरवाडी, तैलबैला,आडगांव, सालतर, आसनवाडी, हिरडी,वांद्रे, गोठे, घुसळखांब,माजगांव, वारक, ढोकळवाडी,शिरगांव, वडगांव,आहिरे, आहेरवाडी, सुसाळे, एकोले, विसाघर, देवघर,दत्तवाडी, शेडाणी, वळणे या गावातील तसेच इतर तुरळक ठिकाणी शेती, घरे,पशु तसेच इतर काही गोष्टीचे नुकसान झालेले आहे. तरी तातडीने झालेल्या हानी व नुकसानीचे पंचनामे करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाला निर्देश द्यावेत असे निवेदन तहसिलदार अभय चव्हाण यांना देण्यात आले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दादाराम मांडेकर,युवा नेते मधुर दाभाडे, भोर विधानसभा युवक अध्यक्ष राहूल जाधव, अमित जांभुळकर,संदीप हुलावळे,संदीप केदारी,विजय चांदेरे,मोहन मातेरे उपस्थित होते. मुळशी तालुक्यात चक्रीवादळावेळी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले असून धरणभागातील इतर ठिकाणचाही आढावा घेऊन त्याचेही लवकरच पंचनामे करण्यात येतील असे तहसिलदार अभय चव्हाण यांनी सांगितले.