मुळशी : आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रयत्नातून होत असलेल्या वारक ( ता.मुळशी ) गावातील वीजेचे खांब बदलाचा शुभारंभ काँग्रेस तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरे यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आला.
वारक गावामध्ये वीजेचे एकूण ४२ खांब आहेत. हे सर्व खांब जीर्ण झालेले होते. तसेच अनेक खांब पडले देखील होते. वारक गावच्या सरपंच शिल्पा संतोष पोकळे यांनी आमदार संग्राम थोपटे यांच्याकडे हे सर्व ४२ खांब बदलून मिळावेत अशी मागणी केली होती. आमदार संग्राम थोपटे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून वारकसाठी ४२ खाबांच्या निधीसाठी तरतूद केली आहे. या नवीन बसविण्यात येणाऱ्या खांबाच्या कामाचा शुभारंभ आज काँग्रेस तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी महावितरणचे अभियंता फुलचंद फड, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दादाराम मांडेकर, भोर विधानसभा युवक अध्यक्ष राहूल जाधव, अमित जांभुळकर,संदीप हुलावळे,संदीप केदारी, लक्ष्मण ठोंबरे, पिरंगूटचे माजी सरपंच राजाभाऊ वाघ, ग्रामपंचायत सदस्य दिपाली विनायक ढोकळे, सुभद्रा विलास पोकळे, कल्याणी श्रीपती वोहाळ, सुजाता अंकुश मराठे, भगवान पोकळे, लक्ष्मण कोंढेकर, उपअभियंता प्रभू देसाई, काँट्रक्टर गायकवाड उपस्थित होते.
वारक गावातील वीजेचे खांब जीर्ण झालेले होते. येथील सरपंच शिल्पा संतोष पोकळे यांनी आमदार संग्राम थोपटे यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार हे काम होत असून पावसाळ्याच्या अगोदर हे काम पूर्ण होणार असल्याचे काँग्रेस तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरे यांनी सांगितले.