पोलीस प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहिती वरुन उरावडे रोडवर भेसळयुक्त खवा व बर्फीबनवणाऱ्या कंपनीवर पोलीस व अन्न व औषध प्रशासन यांच्या वतीने छापा टाकून सुमारे 10,73,650 रुपयाचा साठा जप्त केला आहे.
उरावडे रोडवर कोकाकोला कंपनी जवळ कृष्णा फूड्स येथे ही कारवाई करण्यात आली. पोलीस व अन्न व औषध प्रशासन यांच्या वतीने छापा टाकून अन्न, अस्थपणेची तपासणी करून दुधापासून बनवलेले बर्फी, स्कीम मिल्क पावडर, वनस्पती व पाम तेल असा एकूण 10,73,650 रुपयाचा साठा जप्त करण्यात आला. तसेच सुमारे दोन टन तयार बर्फी हा नाशवंत अन्न पदार्थ असल्याने तो जागेवरच नष्ट करण्यात आला. तसेच उर्वरित मालं अन्न व्यावसायिकाच्या ताब्यात देण्यात आला. असुमका 2006 नुसार सदर आस्थपनेला तपासणीत त्रुटींचा अनुषंगाने व्यवसाय बंद चे आदेश देण्यात आले आहे.
सदर कारवाई पोलीस प्रशासन उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले, पौड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस हवालदार राॅकी देवकाते, पोलीस नाईक सिद्धेश पाटील, साहिल शेख तसेच
अन्न व औषध प्रशासन सह आयुक्त नारायण सरकटे, अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती अस्मिता गायकवाड, सोपान इंगळे या अन्न व औषध प्रशासनाच्या अधीकारी यांच्या संयुक्त पथकाने केली.
गणपती काळात मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याने त्याचा गैरफायदा घेत व्यापार्यांकडून भेसळयुक्त व बनावट मिठाई ग्राहकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न होत असतो. बाजारात असलेली मिठाई शुद्ध खव्यापासूनच बनवलेली असेल याची कोणतीही शाश्वती नाही. ग्राहकांनीही मिठाई खरेदी करताना सावध राहावे. बाजारात भेसळयुक्त मिठाईचे प्रमाण वाढले आहे.