logo
add image
add image
Blog single photo

समाज प्रबोधनाचे काम गणेश मंडळे दहा दिवस करू शकतात : उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील


पौड : गणेश मंडळावर अनावश्यक बंधने लादण्यात येणार नसून गणेश मंडळानीही कायद्याच्या चौकटीत राहिले पाहिजे.ठरविले तर समाज प्रबोधनाचे काम गणेश मंडळे दहा दिवस करू शकतात असे प्रतिपादन हवेलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील यांनी पौड येथे केले.

           सार्वजनिक गणेशोत्सव २०२२ पूर्वतयारी बैठक पौड येथील सेनापती बापट सभागृह येथे पार पडली. यावेळी ढोले पाटील बोलत होते. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक देवकर, रमेश गायकवाड, महावितरणचे अभियंता फुलचंद फड, जेष्ठ नेते आबासाहेब शेळके, चंदाताई केदारी,पोलिस पाटील संजय पिंगळे,सरपंच अजय कडू, मुनीरभाई मुलाणी, आपत्ती व्यवस्थापनचे प्रमोद बलकवडे उपस्थित होते.

        यावेळी बोलताना भाऊसाहेब ढोले म्हणाले की, ध्वनी प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे साऊंडचा आवाज असावा. तक्रार आल्यास मंडळावर कारवाई करण्यात येईल. पौड पोलिस स्टेशनकडूनही आदर्श गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून पारंपारिक पध्दतीने मिरवणूक काढण्यात यावी.

        सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक देवकर म्हणाले की, देखावा सादर करताना दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. यावर्षी गणेश मूर्तीच्या उंचीवर बंधने नाहीत.रोडवर गणेश मंडळ नसावे जेणेकरून वाहतूकीस अडथळा निर्माण होईल. मंडळाचे रजिस्ट्रेशन आँनलाईन पध्दतीने असून ते मंडळाने करून घ्यावे. विशेष करून रोडला असणाऱ्या पौड, पिरंगुट आणि भुगांव येथील मंडळानी काळजी घ्यावी.विसर्जन घाट पौड,भरे, आंग्रेवाडी या ठिकाणी असून तेथेही बंदोबस्त ठेवण्यात येईल.

      महावितरणचे अभियंता फूलचंद फड म्हणाले की, मंडळांनी रितसर कनेक्शनसाठी अर्ज करावा. एका दिवसांत मंडळाला वीज कनेक्शन देण्यात येईल.मंडळात लाईटिंगवेळी चांगली वायर वापरावी.तसेच लाकडाचा वापर करावा. मिरवणूकवेळी उंच देखावे टाळावेत जेणेकरून रस्त्याच्या वरील बाजूच्या वायरिंगला धक्का लागणार नाही.

      जेष्ठ नेते आबासाहेब शेळके म्हणाले की, आबासाहेब शेळके मिञ मंडाळाकडून गेली १२ वर्ष आदर्श गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. कोरोना काळात मंडळाने समाजपयोगी अनेक कामे केली. यावर्षी मंडळाकडून वेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून रोख रक्कम न देता प्रथम क्रमांक मंडळातील दहा जणांना, द्वितीय क्रमांकाच्या सात जणांना आणि तृतीय क्रमांकाच्या पाच जणांना हेलिकँप्टरची सफर घडविण्यात येणार असून हा एक आगळावेगळा उपक्रम ठरणार आहे.

add image
add image

Leave Comments

Top