logo
add image
add image
Blog single photo

बाल आशा घर आंबवणे येथून गेलेल्या पाच जणापैकी तीन मुले सापडली


पौड : आंबवणे (ता. मुळशी) येथील बाल आशा घरातून पाच अल्पवयीन मुलांना अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना घडली होती. यापैकी तीन मुलांना शोधून काढण्यात पौड पोलिस आणि आशा बालघरच्या कर्मचाऱ्यांना यश आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी दिली आहे

     यातील १ ) श्रीपत लहू मोरे (  वय ११ वर्षे रा.जवळ गाव ता.मुळशी जि.पुणे)  २)गणपत भूरिया उघडे ( वय ११वर्षे रा.खंडाळा ता.मावळ पुणे )  ३) आलू/सागर सुदाम वाघमारे ( वय ११ वर्षे रा.साठेसाई ता. मुळशी. पुणे) हे चिखलगाव दूर्गेवाडी कातकरी वस्ती येथे मिळून आले आहेत.

        या प्रकरणी मनोज सदाशिव गवळी (वय ३६ वर्षे, धंदा नोकरी सध्या रा नांदगांव पो. आंबवणे, ता. मुळशी, जि. पुणे,  मुळ रा. चाळीसगांव) यांनी फिर्याद पौड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.आंबवणे गावात संपर्क बाल आशाघर आहे. २६ जानेवारी रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास येथील पाच मुलांना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले आहे. या घटनेची बातमी प्रसिद्ध होताचा सर्वञ चर्चाचा विषय ठरला होता.या पार्श्वभूमीवर पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी याठिकाणी येऊन पाहणी केली होती.

                तर पोलिस उपअधिक्षक राजेंद्र पाटील,पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, बाल आशाघरचे संस्थापक अमित बँनर्जी, नियोजन समिती सदस्य अमित कंधारे,मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष अंकुश मोरे,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा संघटक विठ्ठल पडवळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र शिंदे, बीट अमंलदार मुजावर, देवघरचे पोलिस पाटील विजय हुंडारे, आंबवणेचे पोलिस पाटील गणेश दळवी हे सुध्दा यावेळी उपस्थित होते.

       

add image
add image

Leave Comments

Top