पौड : मुळशीतील तिकोणा किल्ल्याच्या पायथ्याशी काशिग मध्ये मोकाट वळुचा गेले दोन महीने थरार सूरू होता.मागील दोन महिन्यापासून काशिग मध्ये वाघा पेक्षा मोठी या वळूची दहशत होती. आजपर्यंत काशिग मधील शेळकेवाडी गावठाण व भीमनगर या भागातील कुटुंबातील सुनिता गोरे ( वय ३०वर्षे ), छगन कदम ( वय ६५वर्षे), बाजीराव काळे (वय ५६) या ग्रामस्थांना सदरील वळुने मारल्यामुळे हे ग्रामस्थ जखमी झाले होते. तसेच परिसरातील शेतातील पिकांची खुप मोठ्या प्रमाणात नुकसान केले.
अखेरीस काशिगचे ग्रामसेवक जाधव आणि ग्रामस्थांनी पौड पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ,मुळशी तालुका गटविकास संदिप जठार, नायब तहसीलदार मिसाळ,पशु संवर्धन अधिकारी राऊत मँडम यांच्या मागणीनुसार मुळशीचे तहसीलदार अभरा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मुळशी तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे व्यवस्थापक अध्यक्ष प्रमोद बलकवडे यांच्या सह टिम रवाना करण्यात आली, जवळपास ५ तासांच्या अथक प्रयत्नानंतर दुसऱ्या प्रयत्नात वळुला जेरबंद करण्यात टिमला यश आले, या नंतर काशिगमधील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.
सदर वळुला जेरबंद करतेवेळी मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद बलकवडे, समीर सुतार, पंडित बलकवडे, दिनेश धनवे, रोहित सुर्वे, नवनाथ सुतार, सुरज मारणे,दत्ता शेळके, बबन शेळके, राम टेमघरे, प्रशांत टेमघरे, चैतन्य सुतार, सोनु मोहोळ, सुजल शेळके उपस्थित होते.