logo
add image
add image
Blog single photo

आंबवणे येथील बाल आशाघरची पोलिस अधिक्षक डाँ. अभिनव देशमुख यांच्याकडून पाहणी


पौड : आंबवणे (ता. मुळशी) येथील बाल आशा घरातून पाच अल्पवयीन मुलांना अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक डाँ.अभिनव देशमुख यांनी नांदगांव येथील संपर्क आशा बालघरची पाहणी करून माहिती घेतली आहे.तसेच पुढील तपासाबाबत पौड पोलिसांना सूचनाही केल्या आहे.

        या प्रकरणी मनोज सदाशिव गवळी (वय ३६ वर्षे, धंदा नोकरी सध्या रा नांदगांव पो. आंबवणे, ता. मुळशी, जि. पुणे,  मुळ रा. चाळीसगांव) यांनी फिर्याद पौड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.आंबवणे गावात संपर्क बाल आशाघर आहे. २६ जानेवारी रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास येथील पाच मुलांना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले आहे. या घटनेची बातमी प्रसिद्ध होताचा सर्वञ चर्चाचा विषय ठरला होता.या पार्श्वभूमीवर पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी याठिकाणी येऊन पाहणी केली आहे.

                यावेळी पोलिस उपअधिक्षक राजेंद्र पाटील,पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, बाल आशाघरचे संस्थापक अमित बँनर्जी, नियोजन समिती सदस्य अमित कंधारे,मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष अंकुश मोरे,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा संघटक विठ्ठल पडवळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र शिंदे, बीट अमंलदार मुजावर, देवघरचे पोलिस पाटील विजय हुंडारे, आंबवणेचे पोलिस पाटील गणेश दळवी, उद्योजक गोरक्ष कराळे, विलास हुंडारे,नवनाथ दळवी,मनोज गवळी,संभाजी फाटक, अमर लोखांडे उपस्थित होते.


         संपर्क संस्था हि मुळशी तालुक्यातील धरण भागात आदिवासी किंवा इतर गरीब मुलासाठी गेली वीस वर्षापासून वस्तीगृह चालवत असून या संस्थेतून अनेक गुणवान विद्यार्थी घडलेले आहेत. या संस्थेचे काम उत्कृष्टच असल्याचे जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित कंधारे यांनी सांगितले.

add image
add image

Leave Comments

Top