मुळशी : मुळशी तालुक्यातील माले आणि वळणे येथे झालेल्या अतिवृष्टीची काँग्रेस तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरे यांच्याकडून पाहणी करण्यात आलेली असून नुकसानग्रस्त गावांचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी यासाठी तहसीलदार अभय चव्हाण यांना निवेदन देण्यात आले आहे.तसेच भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्याकडून झालेल्या अतिवृष्टीची दखल घेण्यात आलेली आहे.
माले येथे सर्वाधिक नुकसानीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. माले येथे हिवाळी वस्ती ते मुख्य रस्ता दरम्यान अनेक शेतांचे नुकसान झालेले आहे. तर काही ठिकाणी रस्ते वाहून गेलेले असून घरामध्येही पाणी शिरले होते.तर वळणे येथे दोन ते तीन ठिकाणी रस्ता वाहून गेलेला असून प्रशासन व ग्रामपंचायत मार्फत रस्ता दुरूस्त करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे.
यावेळी वळणे गावचे सरपंच समीर सातपुते,मालेचे सुहास शेंडे, विनोद दातीर,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नकुल रणसिंग , ज्युनियर इंजिनिअर विनय जाधव, मंडल अधिकारी संदीप थिटे, तलाठी श्रीमती सरतापे,उज्वल ववले, गोपाळ कदम, बुधभूषण कांबळे, ओमकार ढमाले तसेच काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते यांनी पाहणी केली.