logo
add image
add image
Blog single photo

एसव्हीएस ॲक्वा कंपनीवर कडक कारवाई करणार : कामगार राज्यमंञी बच्चू कडू


पौड : एसव्हीएस ॲक्वा कंपनीवर कडक कारवाई केली जाईल. राज्यातील हि खूप मोठी घटना आहे. राज्य सरकारने कुटुंबासाठी पाच लाख रूपयांची मदत जाहिर केली आहे.तसेच कंपनीकडूनही कुटुंबासाठी मदत मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न राहिल. पंधरा वीस दिवसांत कुटुंबाच पुनर्वसन केले जाईल. राज्य शासनाकडून अजूनही मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहिल असे प्रतिपादन कामगार राज्यमंञी बच्चू कडू यांनी पिरंगूट येथे केले.

         पिरंगूट परिसरातील एसव्हीएस ॲक्वा कंपनीला काल लागलेल्या आगीत १७ जणांचा जळून मृत्यू झाला. या गंभीर घटनेची नोंद केंद्र तसेच राज्य सरकारने घेतली. आज सकाळी गृहमंञी दिलीप वळसे पाटील,खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे यांनी कंपनीला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर लगेचच कामगार राज्यमंञी बच्चू कडू यांनी कंपनीची पाहणी केली. तसेच कुटुंबाच्या नातेवाईकांना मोठी मदत करण्याचेही जाहीर केले.

       यावेळी  पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष नंदकिशोर जगदाळे, पुणे जिल्हा संघटक नीरज कडू,मुळशी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष सुहास भोते, पुणे जिल्हा अध्यक्ष अनंतराव काळे, पुणे शहराध्यक्ष सुनील गोरे, हवेली तालुका अध्यक्ष महेश तनपुरे, पुणे शहर उपाध्यक्ष रोहित भोसले, पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष संदीप जाधव उपस्थित होते.

add image
add image

Leave Comments

Top