पौड : घडलेली घटना खूपच दुर्देवी आहे.मृतदेहाची ओळख पटवणे कठीण आहे.घटनेचा प्राथमिक अहवाल आज प्राप्त होणार असून सर्व मृत्यू झालेल्या नागरिकांचे डीएनए चाचणी करण्यात येणार आहे.कंपनीचे मालक शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडेही चौकशी चालू आहे. कंपनीचे मालकांवर विविध कायदान्वये गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंञी दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
पिरंगूट परिसरातील एसव्हीएस ॲक्वा कंपनीला काल दुपारी आग लागली होती. यात सतरा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. याची पाहणी आज गृहमंञी दिलीप वळसे पाटील यांनी केली.पाहणी नंतर गृहमंञी दिलीप वळसे यांनी मयताच्या नातेवाईकांशी चर्चा केली.
त्यांच्यासमवेत बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख,राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशध्यक्षा रूपाली चाकणकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे,तहसिलदार अभय चव्हाण, पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, गटविकास अधिकारी संदीप जठार,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सविता दगडे, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर,अंजली कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे,काँग्रेस तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरे, सभापती पांडुरंग ओझरकर, उपसभापती विजय केदारी, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित कंधारे,माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम इंगवले,भोर विधनसभा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुनिल चांदेरे, नेते राजाभाऊ हगवणे,राष्ट्रवादी काँग्रेस मुळशी महिला अध्यक्ष दिपाली कोकरे, युवा नेते मधुर दाभाडे,भोर विधान सभा युवक काँग्रेस अध्यक्ष राहूल जाधव, महावितरण अभियंता फूलचंद फड यावेळी उपस्थित होते.
खासदार सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या की, अशा घटना होऊच नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.फायर ब्रिगेडची व्यवस्था पिरंगूट परिसरात करणे गरजेचे आहे माञ आर्थिक अडचणी येत आहेत.
गृहमंञी दिलीप वळसे पाटील आज घटना स्थळाला भेट देणार असल्यामुळे आग लागलेल्या ठिकाणी छावणीचे रूप आले होते. पिरंगूट,घोटावडे फाटा येथे मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.