मुळशी : मुळशी तालुक्यात वीज बिल थकलेल्या ग्राहकांची वीज कनेक्शन तोडू नये, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अतुल उर्फ आप्पासाहेब सुतार यांनी केली आहे. यासंबंधी त्यांनी मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांना दिले आहे.
महाराष्ट्र राज्यभरात थकीत वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडणे चालू आहे. मुळशी तालुक्यात वीज तोडणी मोहिम सुरू आहे. गेल्या वर्षीच्या टाळेबंदी मुळे अनेकांना आर्थिक समस्या निर्माण झालेल्या आहेत.