logo
add image
add image
Blog single photo

पोलिस पाटीलांच्या चांगल्या कामामुळे गावे सुरक्षित : पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ


पौड - मुळशी तालुक्यातील हाँटेल चालक, घरमालक तसेच इतर छोटे मोठे व्यवसायिक यांच्याकडे येणाऱ्या अनोळखी नागरिकांची माहिती त्यांनी ग्रामसुरक्षा यंञणेला देणे गरजेचे आहे.यातुन होणारे  गुन्हे रोखले जातील तर झालेल्या गुन्ह्याची उकल होण्यास मदत होईल. पोलिस पाटीलांनी आपल्या गावात काम करताना सतर्क राहावे असे प्रतिपादन पौडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी पौड येथे केले.

       जिल्हा पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांच्या संकल्पनेतून साकरत असलेल्या कोरोना काळात उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलिस पाटलांचा सन्मानपञ देऊन सन्मान करण्याच्या कार्यक्रम प्रसंगी पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ बोलत होते. यावेळी पोलिस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रकाश पवळे, पोलिस नाईक संजय सुपे, पोलिस पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष दत्ताञय रानवडे, पौडचे पोलिस पाटील संजय पिंगळे, रामदास मानकर, संदेश हरगणे, सुरेश तिकोणे, स्वाती गोळे, स्वाती सुतार, शारदा दातीर तसेच विविध गावचे पोलिस पाटील यावेळी उपस्थित होते.

       यावेळी बोलताना अशोक धुमाळ म्हणाले की कोरोना काळात आपले गाव सुरक्षित राहावे. येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची माहिती देणे घेणे, तहसिलदार कार्यालय, पोलिस स्टेशन,ग्रामपंचायत यांच्याशी संपर्कात राहून गावात कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून सर्व पोलिस पाटीलांनी रस्त्यावर उतरून काम केले. बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांना गाड्याची मदत, गावात गरजूंना किराणा किट वाटप तसेच गरजेनुसार तयार जेवणही काही पोलिस पाटील यांनी पुरविले.

फोटोओळ : कासारआंबोलीच्या पोलिस पाटील स्वाती सुतार यांचा प्रशंसापञ देऊन सन्मान करताना अशोक धुमाळ, प्रकाश पवळे, दत्ताञय रानवडे.

add image
add image

Leave Comments

Top