logo
add image
add image
Blog single photo

शासन आपल्या दारी ठाकरे सरकार घरोघरी या उपक्रमाने हजारो नागरिकांचे प्रश्न मार्गी लागले.


पौड : मुळशी तालुक्यातील नागरिकांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार मुळशी तालुक्यातील महसूल विभाग, महावितरण कार्यक्रमाचे उद्घाटन मावळ मुळशीचे प्रांतधिकारी संदेश शिर्के, तहसिलदार अभय चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे,सहसंपर्क प्रमुख कुलदीप कोंडे,बाळासाहेब चांदेरे,म्हाडाच्या संचालिका स्वाती ढमाले, महिला आघाडी पुणे जिल्हा संघटिका संगीता पवळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन युवा सेना जिल्हाधिकारी अविनाश बलकवडे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले.        

        सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा फायदा व्हावा. तलाठी, मंडल अधिकारी, महावितरण व सर्व लाभांच्या योजना सर्वसामान्य लाभार्थ्यांना वेळ न घालवता तेथेच सोडवविण्यात याव्यात. ह्या ठिकाणी प्रश्न न सुटल्यास जी कामे प्रलंबित राहिले आहेत ती मुळशी प्रशासन दरबारी पाठपुरावा करून १५ दिवसांत सोडवली जावीत हा यामागील उद्देश होता. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के, जिल्हाप्रमुख रमेश कोंडे,सहसंपर्क प्रमुख कुलदीप कोंडे, बाळासाहेब चांदेरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. विधानपरिषद उपसभापती नीलम गोह्रे यांनीही मुळशी तालुक्यात हा कार्यक्रम घेतल्याबद्दल मुंबईतून व्हिडिओ कॉन्फरन्सन द्वारे मार्गदर्शन केले व सर्व संयोजकांना शुभेच्छा दिल्या. मुळशी तालुक्यातील विविध विकासकामासाठी अकरा लाख रूपये व एक रूग्णवाहिका विकासनिधीतून देणार असल्याचे जाहीर त्यांनी केले 

           कार्यक्रमाचा समारोप माजी आमदार शरद ढमाले,तहसिलदार अभय चव्हिण यांच्या हस्ते प्रशासनाकडून रेशनिंग कार्ड,रहिवासी दाखले,उत्पन दाखले,जातप्रमाणपत्रे वाटप करून करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, सागर काटकर उपसभापती विजय केदारी, गटविकास अधिकारी संदीप जठार,आरोग्य अधिकारी डाँ. अजित कारंजकर, कृषी अधिकारी कुडत हजरमुनी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणचे बुंदेले, युवासेना उपजिल्हाधिकारी सचिन खैरे, शिवसेना भोर विधानसभा संघटक प्रकाश भेगडे, संतोष मोहोळ, रविकांत धुमाळ,मुळशी युवासेना प्रमुख संतोष तोंडे, महिला आघाडी तालुकाप्रमुख ज्योती चांदेरे, ज्ञानेश्वर डफळ, धनंजय टेमघरे, भानुदास पानसरे, हिराताई पडळघरे,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राम गायकवाड, अमोल मोकाशी, नागेश साखरे, गणपत वाशिवले, शरद शेंडे,जेष्ठ नेते नामदेवआप्पा टेमघरे, दिपकआबा करंजावणे, नाना शिंदे, दिलीप गुरव ,सूर्यकांत साखरे,सचिन दगडे,राजाभाऊ शेळके,पोपट ववले, यशवंत गायकवाड,सरपंच सुनील वाईकर माऊली केमसे, निवृत्ती गायकवाड, सरपंच नरेश भरम,शिल्पा पोकळे, वंदना कदम, जयश्री ओव्हाळ, विनोद कंधारे,लहू चव्हाण, अनंता कंधारे,दत्ता मेंगडे, सुरेश ठोंबरे, मोहन शिंदे, संतोष अधावडे, गणेश भोईने,सुरेश शिंदे,सचिन पळसकर, शिवाजी बलकवडे ,पांडुरंग निवेकर, विश्वनाथ वीर,लहू लायगुडे, शैलेश मालपोटे,अर्जून पाठारे,भाऊ आखाडे, सुहास बामगुडे,दादा दहीभाते, रुपेश जाधव, योगेश बामगुडे, बाळासाहेब मरवडी, विष्णू ढोरे, अनंता मापारी,अनंता वाशिवले, नितीन साठे,नारायण धिडे,संजय ढमाले,माणिक जोरी,विशाल कालेकर,विशाल पडवळ, प्रवीण सोनार, खंडू उभे तसेच सर्व महसूल अधिकारी, मंडलअधिकारी तलाठी, कृषी, विद्युत वितरण चे सर्व अधिकारी वर्ग हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच हनुमंत सुर्वे व स्वप्नील तापकीर यांनी केले. आभार गोविंद सरुसे यांनी मानले.याप्रसंगी विविध गावचे सरपंच उपसरपंच पोलीस पाटील हजारो लाभार्थी ग्रामस्थ व जय शिवराय प्रतिष्ठानचे सर्व शिक्षक वर्ग वृंद व कर्मचारी उपस्थित होते.

add image
add image

Leave Comments

Top