पिरंगुट : मुळशी तालुक्यातील भूकूम गावाजवळील हरिराम आश्रय मठात टाळ, मृदुगाच्या नादात माघ शुद्ध दशमी उत्सव हरिनामाच्या गजरात संपन्न झाला. कोरोनामुळे तब्बल 52 वर्षांनंतर प्रथमच हा उत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला.
संत गणोरेबाबांनी 1968 पासून सुरू केलेल्या माघ शुद्ध दशमी उत्सवाचें यंदा 53 वे वर्ष होते. मात्र कोव्हिडमुळे सप्ताह रद्द करून केवळ माघ शुद्ध दशमीची दिवस मठात उत्साहात साजरा करण्यात आला. हभप गणेश महाराज कार्ले यांच्या काल्याचे कीर्तनने या उत्सवाची सांगता झाली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते राजाभाऊ हगवणे, शिवसेनेचे नेते नाना शिंदे, नामदेव माझिरे, विजय माझिरे, संत गणोरेबाबा मठाचे विश्वस्त एकनाथ हगवणे, निनाद मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
माघ शुद्ध दशमीच्या दिनी संत तुकाराम महाराजांप्रमाणे संत गणोरेबाबा यांना अनुगृह मिळाला होता. या निमित्ताने झालेल्या उत्सवाचा प्रारंभ संत गणोरेबाांच्या महाभिषेकाने झाला. त्यानंतर काढण्यात आलेल्या पादुका पालखी मिरवणुकीत भूगाव, भुकूम, पिरंगुटसह राज्यातून आलेले भाविकवर्ग सहभागी झाला होता. यावेळी भजनांमुळे भक्तीमय वातावरण निर्माण केले.
संत तुकाराम गाथेचे व गणोरेबाबांच्या ॐ हा गुरू ग्रंथाचे पारायण, हरिपाठ असे अखंड हरिराम सप्ताहातील सकाळच्या सत्रा तर संध्याकाळी श्री बाबांच्या अभंगाचे भजन असे संध्याकाळी कार्यक्रम झाले. मात्र पन्नाशी वर्षांच्या 7 दिवसांच्या किर्तनाची परंपरा यंदा कोरोनामुळे मोडली. महाप्रसादासाठी मठातील विश्वतांनी कोरोना नियमांचे पालन करीत भक्तांना प्रसाद पॅकेटचे वाटप केले.