logo
add image
add image
Blog single photo

संघटनानेच खेड्यापाड्यांचा विकास- शिवचरणराज डाॅ. संदिप महिंद गुरुजी गेव्हंडे खडक गावात गणेशउत्सवानिमित्तांने आयोजीत केले व्याख्यान


संघटनानेच खेड्यापाड्यांचा विकास- शिवचरणराज डाॅ. संदिप महिंद गुरुजी

गेव्हंडे खडक गावात गणेशउत्सवानिमित्तांने आयोजीत केले व्याख्यान

पवनानगर :- संघटन हे एक कौशल्य असून, संघटन मजबूत केल्याने छत्रपतींनी स्वराज्य स्थापन केले, टिळकांनी गणेश उत्सवाच्या माध्यमातून संघटनाची ताकद दाखवून दिली तर तसेच प्रत्येक गावात संघटन झाले व तरूण पक्षविरहीत   राहून  एकत्र  आले तर गावगावात  विकासाची गंगा वाहू लागेल व महात्मा गांधींजींच्या स्वपनातील खेड्यापाड्यातील विकास होऊ शकेल असे प्रतिपादन शिवचरणराज संदिप महिंद गुरुजी यांनी गणेशउत्सवानिमित्तांने आयोजीत केलेल्या व्याख्यानात  केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, तुंग तिकोणा गडाच्या कुशीत वसलेल्या  खडक गेव्हंडे गावात शासन निर्णयाचे पालन करीत एक गाव एक गणपती म्हणून गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. गणेशउत्सवानिमित्त  शिवसंघटन या विषयावर व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते.   

गावातील तरूण मंडळी नोकरीनिमित्त पुणे येथे असतात, पण गणेशउत्सवाला आवर्जून गावाला येत  असतात. गेले बारा वर्ष हा उत्सव निर्विघ्नपणे तरूण मंडळी पार पाडीत आहे. या वर्षी  गणेशत्सवानिमित्ताने कुठलीही सजावट न करता या गावातील गणेश भक्तांनी व छत्रपती शासन मंडळातील कार्येकत्यांनी शिवचरणरज संदिप महिंद गुरुजी यांचे शिवसंघटन "संघटन " म्हणजे काय, छत्रपतींनी संघटन कौशल्याने मिळावलेले स्वराज्य कसे होते याचे  महत्व गावातील तरूण व बालमनावर बिंबवण्यासाठी  गावातील तरूण शिवभक्त श्री. विजय खैरे यांनी  ." संघटीत एकीचे फळ, अर्थातच शिवस्वराज्य" या विषयावर व्याख्यानाचे  आयोजन केले.  या व्याख्यान्यात शिवचरणराज संदिप महिंद गुरुजी यांनी  छत्रपती शिवाजीराजे यांनी सर्वजाती धर्मातील लोकांना संघटीत करून स्वराज्याची स्थापना  कशी केली, प्रतिकूल परिस्थीतीत असतानाही संघटन हे जर भक्कम असेल तर अनेक अहवाणे लिलया पार करू शकतो यासंबधी अनेक इतिहासातील दाखले देत आग्रा मोहिम असू की सुरतेवरील छापा असो, अफजलखान वध असो की पन्हाळ्याचा वेढा असो  आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर व बरोबर असलेल्या शिलेदारांचे मजूबत संघटन यामुळे  प्रत्येक लढाईत छत्रपती राजे हे यशस्वी ठरले. अशी  एक ना अनेक उदाहरणे आपल्या व्याख्यानातून देत असतांना लोकमान्य टिळकांनी  गणेश उत्सवामुळे देशभर संघटनेचे झाळे तयार करीत जनतेला देश स्वतंत्र्याची हाक  दिली. 

 श्री भैरवनाथ मंदिरात आयोजीत केलेल्या व्याख्यानासाठी  सामाजिक अंतर ठेवून गावातील सरंपच, सदस्य, पोलिसपाटील, मा. सरपंच, अबालवृद्ध, तरूण, लहान व मुलांचा मोठा सहभाग होता. महिला ही या व्याख्यानासाठी आवर्जून  उपस्थित  होत्या.  कार्यक्रमाचे प्रस्ताविक अॅड. श्री. संजय खैरे यांनी केले, तर आभार पोलिस पाटील श्री.  संतोष खैरे यांनी केले.

add image
add image

Leave Comments

Top