पिरंगूट : गेली तीन चार महिने कोरोनामुळे असलेले लाँकडाऊनमुळे हताश झालेल्या व्यापारी वर्ग रक्षाबंधनासाठी बाजारात झालेल्या गर्दीमुळे व्यवसायाला नवसांजीवनी मिळत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनामुळे लागलेल्या लाँकडाऊनमध्ये मुळशी तालुक्यातील व्यापारही बंद पडला होता. जीवनावश्यक वस्तूची दुकाने सोडून सर्व दुकाने बंद होती. दुकाने बंद, कमी कालावधी यामुळे व्यापारी वर्ग हताश झाला होता. कर्जाचे हप्ते भरणे तसेच घर खर्च चालविणे यासाठीही लाँकडाऊनमध्ये मारामार चालायची.
माञ रविवार ( दि.२२) रोजी साजरा होत असलेल्या रक्षाबंधन सणामुळे बाजारात चैतन्य निर्माण झालेले असून राखी खरेदीसाठी सर्वञ गर्दी होताना दिसत आहे. भुंगाव, पिरंगूट, घोटावडे फाटा, पौड या भागात व्यापाऱ्यानी राखीची दुकाने रस्त्याच्या कडेला थाटलेली आहेत. माञ कोरोना अजूनही हद्दपार झालेला नसून खरेदी करताना होणारी गर्दी टाळणे गरजेचे आहे. तसेच मास्क व सोशल डिस्टन्सचेही पालन होणेही महत्त्वाचे आहे.