logo
add image
add image
Blog single photo

मुळशी प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेतील गावांनी पाणी गाळून व उकळून घ्यावे


पौड : मुळशी प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेवर असलेल्या गांव /वाड्याना सध्या गढूळ पाणी येत आहे. तरी सर्व नागरिकांनी हे पाणी गाळून व उकळून घ्यावे असे आवाहन मुळशी नळपाणीपीरवठा योजनेचे उपअभियंता सुनिल पटेकरी यांनी केले आहे.

      मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या    अतिवृष्टीमुळे मुळशी धरणात मोठ्या प्रमाणावर माती वाहून आली असून पाणी गढूळ झाले आहे.आत्तापर्यत धरणातील पाणी ऐवढे कधीच गढूळ झालेले नव्हते. या गढूळ पाण्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ नये म्हणून शुध्दीकरण केंद्र माले व पंपीग स्टेशन भरे येथे पाण्यामध्ये औषधेही वापरणे सुरू आहे.तरी मुळशी प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेवरील गावे/ वाड्या येथील सर्व नागरिकांनी पाणी गाळून व उकळून घ्यावे असे आवाहन जिल्हा परिषद पुणे (मुळशी प्रादेशिक नळपाणी पुरवठा ) योजनेचे उपअभियंता सुनिल पटेकरी यांनी केले आहे.

       

add image
add image

Leave Comments

Top