logo
add image
add image
Blog single photo

कोकणातील पूरग्रस्त भागात पौड वासियांकडून दोन टेम्पो जीवनावश्यक वस्तूंचे वाटप


पौड : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात या  संकटसमयी पौड आणि विठ्ठलवाडी ग्रामस्थांकडून २ टेम्पो भरून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. पौड आणि विठ्ठलवाडी ग्रामस्थांना करण्यात आलेल्या आवाहनाला ग्रामस्थांनीही प्रतिसाद दिला. यावेळी दोन टेम्पो जीवनावश्यक साहित्य जमा झाले होते.जमा झालेली मदत थेट टेमघर गाव,कुसगाव,हेटकरवाडी,नागळवाडी  येथे देण्यात आली. तर काही मदत ही मित्रांकरवी चिपळूण,पोलादपूर येथे पाठवण्यात आली.

         महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमूळे निर्माण झालेली पूर परिस्थिती सर्वांनी पाहिली. कोकण भागात निसर्गाने आपलं रौद्ररूप दाखवल्यावर आयुष्य भर कमावलेल्या स्वप्नांचा निचरा होताना नागरिकांना पाहावा लागला.राहत घर ,कपडे, अन्नधान्य, सगळं डोळ्यासमोर वाहून गेले तर काहिनीं आपली जिवाभावाची माणसं ही गमावली,आता जगण्यासाठी त्यांच्याकडे ना घर आहे ना घालण्यासाठी कपडे आहेत, आणि खाण्यापिण्याची ची अवस्था तेवढीच गंभीर आहे . 

      ह्या सगळ्यात समस्त ग्रामस्थ पौड विठ्ठलवाडीकरांनी मदतीची भुमिका घेतली, पौड गावातून पूरग्रस्त  भागातील काही गावांत मदत पाठवायचा संकल्प केला, ज्यात आपला हातभार गरजेचा आहे.आपण जास्तीत जास्त मदत पाठवण्याचा संकल्प करण्यात आला. आणि वापरात नसलेले सुअवस्थेतले कपडे, पाण्याचे बॉक्स,खाद्यपदार्थ,चप्पल, साफसफाईचे साहित्य,चादर,तांदूळ,गहू,डाळी यासारख्या जीवनावश्यक असणाऱ्या वस्तूचे दोन टेम्पो साहित्य बघता बघता गोळा झाले.

        जमा झालेली मदत पूरग्रस्तांन पर्यंत थेट पोहचविण्याची जबाबदारी राजू शेठ,बंडू आत्तार,सचिन आक्रे,अजय कडू,स्वप्नील दहितुले,हेमंत लांडगे,आणि विशाल राऊत या ग्रामस्थांनी यशस्वी रित्या पार पाडली.

add image
add image

Leave Comments

Top