बावधन : भूगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज तलाव मुसळधार पावसाने पुर्ण क्षमतेने भरला आहे. यामुळे भूगावकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. त्यानिमित्त ग्रामस्थांतर्फे जलपुजन करुन सुवासिनींच्या हस्ते तलावाची ओटी भरन्यात आली.
यावेळी माजी जि. प. सदस्य शांताराम इंगवले, सरपंच निकीता सणस, माजी उपसरपंच वैशाली चोंधे, स्वस्तिक चोंधे, सतिश इंगवले, वैशाली सणस, अर्चना सुर्वे, सुनिता पोळ, भाजपा महिला आघाडी अध्यक्षा वैशाली सणस, नारायण करंजावणे, गुलाब चोंधे, देवराम शेडगे, शंकर शेडगे,रोहिदास सुर्वे, जमानादास इंगवले, दिपक करंजावणे, राहुल शेडगे, विशाल चोंधे, नवनाथ शेडगे, नितीन शेडगे, अनिल पवार, रमेश सणस, भाऊ शेडगे, जिवन कांबळे, मनोहर सणस, जयदिप चोंधे, प्रशांत इंगवले, मयुर सणस, विशाल सुर्वे, सुयश चोंधे, जितेंद्र इंगवले, अमोल पोळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.