logo
add image
add image
Blog single photo

प्रशासनाच्या विविध विभागातील आढावा बैठक


पौड : मुळशी तालुक्यात पर्यटन क्षेत्र मोठे आहे. मात्र कोरोनामुळे  जीवाभावाची अनेक लोक दगावली आहेत. थोडे दिवस निर्बंध पाळणे गरजेचे आहे.सर्वञ लग्नाला गर्दी होत आहे. लग्नावर नियंञण ठेवणेले पाहिजे.मुळशीत तरूण मुले फिरण्यासाठी येत असून पोलिसांनी तालुक्यात नाकाबंदी वाढवावी. गेल्या वर्षभरात प्रशासनाच्या सर्व विभागाचे काम कौतुकास्पद आहे. कोरोनाकाळात प्रशासनाची यंञणा कुठेही कमी पडली नसून तालुक्याला कुठलीही गोष्ट कमी देणार नाही असे प्रतिपादन बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पौड येथे केले.

        मुळशी तालुक्यातील प्रशासनाच्या विविध विभागातील आढावा बैठक पौड येथील सेनापती बापट सभागृहात पार पडली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे, जेष्ठ नेते रामचंद्र ठोंबरे, राजाभाऊ हगवणे, सभापती पांडुरंग ओझरकर, उपसभापती विजय केदारी,  तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, तहसिलदार अभय चव्हाण, पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, गटविकास अधिकारी संदिप जठार,  जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित कंधारे, पंचायत समिती सदस्य राधिका कोंढरे, वैशाली गोपालघरे, चंदा केदारी, बाळासाहेब सणस, सुनिल चांदेरे, सुनिल वाडकर, कार्याध्यक्ष अंकुश मोरे, विनोद कंधारे, निलेश पाडाळे, भगवान नाकती, उज्वला मारणे, सतिश सुतार, जितेंद्र इंगवले, लहूशेठ चव्हाण,विलास अमराळे, समिर सातपुते, दिपाली कोकरे तसेच विविध विभागाचे पदाधिकारी तसेच सरपंच उपस्थित होते.

        यावेळी बोलताना जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतारे म्हणाले की, टंचाईचे पैसे भोर वेल्हा मुळशीला मिळाले होते. गरीब नागरिकांना रेशन मिळाले पाहिजे. प्रत्येक गावात कचरा प्रकल्प होणार नसून पिरंगूट आणि पौड याठिकाणीच कचरा प्रकल्प होणार असून इतर गावात फक्त कचरा गोळा केला जाईल.या कार्यक्रमला महसूल,आरोग्य ,पोलिस ,महावितरण, शिक्षण विभाग, कृषी,वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, एसटी महामंडळ तसेच पंचायत समितीतील विविध विभागांचा आढावा घेण्यात आला.

   "मुळशी सार्वजनिक बांधकाम विभाग रडारवर"

मुळशी तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता नकुल रणसिंग यांच्यामुळे तालुक्यातील अनेक कामे रखडलेली असून ते कोनाचाही फोन घेत नाहीत तसेच त्यांच्या कार्यालयात गेले असता उडवाउडवीची उत्तरे देतात.त्यांनी मान्सून पूर्व रस्त्याची कामे केली नाहीत. तसेच गटारी पण काढल्या नाहीत.पौड कोळवण रस्त्याचे निकृष्ट काम सुरू असताना दुर्लक्ष केले अशी प्रश्नांची सरबत्ती त्यांच्यावर विविध गावच्या नागरिकांनी केली.

add image
add image

Leave Comments

Top