logo
add image
add image
Blog single photo

वादळामुळे वीज पुरवठा होऊ शकतो खंडित


पौड : कोकण किनारपट्टीवरुन चक्रीवादळ जाणार असल्याचे वर्तवले आहे.कोकण किनारपट्टीजवळच मुळशी तालुका आहे. मागील वर्षी तीन जूनला झालेल्या वादळाची झळही मुळशी तालुक्याला सोसावी लागली होती.यामध्ये सर्वाधिक नुकसान महावितरणचे झाले होते. सोसाट्याचा वारा वाहून महावितरणचे पोल पडणे तसेच तारा तुटूणे अशा प्रकारच्या वीज वितरण व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात वीजप्रणालीची पडझड व नुकसान होऊ शकते. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

        विद्युत पुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत करणेसाठी महावितरणचे कर्मचारी व अधिकारी सदैव तत्पर असतातच. परंतु चक्री वादळाचा वेग जास्त असल्यास महावितरणच्या खांब व तारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते व त्या वेळेस विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यास बिलंब लागू शकतो.महावितरणचे खांब कोसळले किंवा विद्युत वाहक तारा तुटून पडल्यास विद्युत वाहक तारांच्या संपर्कात मनुष्य अथवा जनावरे येऊन प्राणांतिक अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

     तरी आपल्या भागात कुठेही महावितरणचे खांब अथवा तारा तुटून पडल्यास त्याच्या संपर्कात कोणी येऊ नये व इतर कोणासही दुखापत होऊ नये म्हणून सदर माहिती त्वरित आपल्या भागामध्ये नेमणुकीस असणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्यास अथवा अभियंत्यास अथवा उपकेंद्रास द्यावी. जेणेकरून आपण एखादी दुर्दैवी अपघाती घटना टाळू शकतो.


add image
add image

Leave Comments

Top